संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती : शरद पवार   

मुंबई :  संजय राऊतांनी काय केले होते, ते नियमित सामनामध्ये रोखठोक भूमिका मांडतात, त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते, फक्त संधीची वाट पाहत होते. त्यांना पत्राचाळ प्रकरणाने संधी दिली असे शरद पवार म्हणाले. खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहऴा शनिवारी पार पडला यावेळी पवार बोलत होते.
 
शरद पवार म्हणाले, पत्राचाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवार्‍याचा प्रश्न निर्माण झाला, त्या चाळकर्‍यांना घरं मिळावी अशी मागणी त्यांची होती. ते संजय राऊत यांच्याकडे पोहोचले. संजय राऊत यांच्या नेहमीच्या लिखाणाने दुखावलेल्या शासकीय यंत्रणेला संधी मिळाली, असे शरद पवार म्हणाले. ईडीचे योगदान या प्रकरणात अधिक आहे. ईडीने केलेल्या खटल्यामध्ये संजय राऊत यांचा संबंध नसताना गुंतवले गेले. जिथे अन्याय होतो, अत्याचार होतो तिथे सामना उभा राहतो. शासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरोधात ते नेहमीच लिहितात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे, असे त्यांनी म्हटले.  
 
मुंबई, महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत होते, हे माहीत असताना त्यांच्या संबंधी कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिले. जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचे सविस्तर लिखाण केंद्र सरकारला कळवले, असे शरद पवार म्हणाले. त्या प्रकरणात ३० ते ३५  लोक असे होते, कंपन्या होत्या, त्यांच्याकडून पैसे काढले गेले, ती रक्कम ५८ कोटींच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरुपात दिली, त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही पण त्यांना आत जावे लागले. संजय राऊत यांना अटक झाली, त्याबद्दल पुस्तक लिहिण्यात आले, असे शरद पवार म्हणाले. 

Related Articles